का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

गुरुवार, २८ जुलै, २०११

(काहीच्या काही) प्रेम कथा - 2

आत्ता तो रागावला  होता, 
"किती वेळ वाट पहाणार" ......... अस काही बाही तो बडबडत होता. 
तेवढ्यात त्याने तिला येताना पाहिले, 
तो मनात मनाला, "येउ दे तिला, नाही बोलणार तिच्याशी"
ती त्याच्या जवळ आली, खूप वेगळी भासली ती त्याला.
वाऱ्यासारखी ........ पारदर्शक .......... आणि गंधाळलेली अशी,
तो तिला काही बोलूच नाही शकला, 
ती येताच त्याला बिलगली, 
म्हणाली, "खूप प्रेम  करते तुझ्यावर"
कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत होती, गच्च मिठी मारली होती तिने........
शेवटी त्यानेच तिला बाजूला केले,
आणि म्हणाला, "चल जरा फिरून येऊ, मला लवकर घरी जायला हवं, आईचा वाढदिवस आहे माझ्या."
 ते दोघ रस्त्यावर आले, एका ठिकाणी खूप गर्दी जमली होती, 
अचानक सगळे त्या दोघांकडे पाहू लागले. त्याला  काही  समजेना .........
काय झाले म्हणून तो निरखून पाहू लागला,
एका  ट्रक खाली एक मुलगी मरून पडली होती....... "ती"च होती "ती", 
त्याने ओळखले तिला ............
काहीच बोलला नाही तो तिला .... 
डोळ्यात पाणी जमा झाल त्याच्या .......... अजून गर्दी त्यांच्याकडे आणि तिच्याकडे आश्चर्याने  पाहतच होती.
क्षणात  त्याने निर्णय घेतला .........
त्याची नजर रस्त्यावर शोधक नजरेने  भिरभिरत होती,
 ते  पाहून तिचे हि डोळे भरून आले,
ती हळूच कापऱ्या आवाजात पुटपुटली, "आज आईचा वाढदिवस आहे ना तुझ्या, आजचा दिवस तरी नको"
त्याने एकूण न एकल्या सारखे केले. त्याची भिरभिरती नजर तशीच काहिती शोधत  होती.  त्याने आपला  निर्णय घेतला होता.

बुधवार, २७ जुलै, २०११

(काहीच्या काही) प्रेम कथा


अशी मनापासून हसत जाऊ नकोस

अशी मनापासून हसत जाऊ नकोस
 मुल प्रेमात पडतील तुझ्या ..........
नंतर मुलांना दोष देऊ नको, "
मेली खड्यात पडावं तशी प्रेमात पडतात म्हणून" 

तू डोळ्यांला .....

तू डोळ्यांला गॉगल लावलास म्हणून ...
नाही तर त्यावर मी एक कविता करणार होतो.
वाचलीस........... 

तुझा मोहक गंध

तुझा मोहक गंध,
आपोआपच श्वासातून माझ्या शरीरात गेला..........
श्वास नलिकेतून हृदयात गेला, तेथे रक्तात मिसळला.
आणि मग ........ माझ्या नसा नसात दौडू लागला.
आत्ता म्हणू नको, मी पहिल्याच भेटीत एका अनोळखी मुलीच्या प्रेमात पडलो म्हणून.

एका चुटकी सरशी ........

एका चुटकी सरशी मी काळाला थांबवू शकतो.
त्याला पुढे आणि मागे नेऊ शकतो.
तू विचारशील कसे ?
तर एक,
मी प्रेमात पडलोय ............
प्रेमात माणूस वेडा होतो आणि वेडेपणात माणूस काहीही बडबडू शकतो. हे तुला सांगायची गरज आहे का ? 

मी पावसात .........

मी पावसात चिब भिजत होतो
दुखः वाहून जाईल म्हणून ..........
शेवटी मला चिब भिजताना पाहून दुखःच म्हणाले,
कशाला त्रास करून घेतोस,
अस खोलवर रुतलेल पावासाने वाहून जाईल का ?

शुक्रवार, २२ जुलै, २०११

माझ्या (काहीच्या काही) कविता : 5

1) रागावतेस कशाला माझ्यावर,
मी निघून चाललोय तुझ्या आयुष्यातून
पहिलं माझ्या तुटलेल्या हृदयाचे तुकडे तर जमा करू देत 



2) "हे बोलून तिचे दुश्मन तिला हसत निघून गेले, 
तुझा प्रियकरच बस झाला, तुला रडवायला "

3) श्वसांच्या असण्याला नका समजू जिवनाच लक्षण 
जिवंत असूनही मरून जातात काही लोक

सोमवार, १८ जुलै, २०११

विरहानंतरची भेट

साधारण महिन्याभराच्या विरहा नंतर ते भेटत होते.
ते हि अश्या ठिकाणी ज्याची आपण फक्त कल्पनाच करत असतो.

त्याला पाहून तिला आनंद तर झालाच होता पण अतीव दुखः हि झाले
काय घडले असावे ते तिला बहुतेक समजले असावे.
ती त्याला म्हणाली,
तू आत्मह्त्यातर केली नाहीस ना ?
तो म्हणाला,
नाही ग, मी फक्त माझ शरीर संपवलं. इकडे ते घेऊन येता येत नाही ना.

माझ्या (काहीच्या काही) कविता : भाग 4


1) देवही वरून तीला वाकून वाकून पाहत होता 
आणि म्हणत होता ...............
"च्या मायला, हिला खरचं मी बनविली" 


2) प्रेमाचा स्पर्श ...................

प्रेम हे खर तर चड्डीत झालेल्या शूशु सारखा असत .............
दुसऱ्यानला ते फ़क्त दिसून येत आणि जमल्यास वास,
पण तो ओलावा , तो थंडावा , तो स्पर्श फ़क्त स्वतालाच जाणवू शकतो

3) मला प्रेम मिळाल होत खर ............
पण प्रेम करायचं राहूनच गेल 

4) तो सोडून गेल्या नंतरही 
ती त्याला विसरूच शकली नाही 
तिने दिलेले तिचे हृदय 
ती मागायचच विसरून गेली होती ...........
त्याच्या कडून 

5) मी रोज तुला पाहतो,
आणि "तू कालच्या पेक्षा आज जास्त सुंदर दिसतेस" 
अस उगाच वाटून जात 

6) "माझे प्रेम स्वीकारल्या बद्दल तुझे खूप खूप आभार"
"अरे मी काय तुला भिक नाही दिल, प्रेम दिलय. आभार कशाला मानतोस."

7) तू रस्त्याने येत होतीस ,
तेव्हा लोक उगाच ओरडत होते ................
"पळा पळा सुनामी आली"

8) माझ्या डोळ्या देखत तीच दुसऱ्याशी लग्न लागलेलं पाहून 
माझा देवावरचा विश्वासच उडाला.
आणि एक वर्षा नंतर ...............
मी तिच्या नवरयाला पाहिला
तेव्हा माझा देवावर पुन्हा विश्वास बसला
मी किती मूर्ख, ज्याने देवाच्या अस्तित्वावर शंका घेतली
देवा मला माफ कर 

9) मी एकटा आहे, हे तुला कोणी सांगितले 
माझ्या खिशात नेहमी तुझा फोटो असतो 
आणि हृदयात तुझ्या आठवणी 

10) हे हृदया जरा संभाळून ....... ...........
समोरून ती येतेय 

11) खर सांग तू कोनाशी संवाद साधत होतीस,
त्या परमात्म्याशी कि तुझ्या अंतर आत्म्याशी ...................
कि माझ्या निराकार हृदयाशी 

13) तू म्हणालीस, माझ्यासाठी रडत जाऊ नकोस 
ठीक आहे, पण मग तू मला पाषाण हृदयी म्हणत जाऊ नकोस.

14) तो तिला म्हणाला,
"तुझमे रब दिखता है,
यारा मे क्या करू 
सजदे सर झुकता है
यारा मे क्या करू ?"
त्यावर ती म्हणाली,
अय्या तुला कस माहित माझ्या अंगात देवी येते म्हणून ......................

15) आता पावसाला विचरायचेय मला 
तू सगळ्यांना भिजवतोस,
मग तुला कोण भिजवतो 

16) कोणीतरी समुद्राला त्याच्या लाटा सांभाळून ठेवायला सांगा,
सुनामी आणायला हिच पुरेशी आहे

17) ती रस्त्यावर सजून निघाली 
तेव्हा वारा हि थांबला 
आणि मग ............
लोक गुदमरून मरायला लागली 


माझ्या (काहीच्या काही) कविता : भाग 3

आयुष्याच्या वाटेवर असंख्य खिळे विखुरलेली असतात
ते टोचतील म्हणून घाबरायचं नाही,
ते जमा करून भंगारवाल्याला विकून टाकायचे

जर एखादी व्यक्ती जगाला विसरून प्रेम करू शकते

तर ती व्यक्ती 
जगाला विसरून तिरस्कार हि करू शकते 
कारण ..
एक अति सुंदर आरसा जेव्हा तुटतो 
तेव्हा तो खतरनाक हत्यार बनतो

प्रिये 

तू कुत्री, डुक्कर, लोमडी, कावळा, कबुतर सारखी आहेस.
.
माझ्या बोलण्याचा अर्थ तू इमानदार, मेहनती, चलाक, स्मार्ट आणि शांत आहेस.

श्वेता घाग , मी आहे वाघ 

आयुष्यभर प्रेम करत राहील तुझ्यावर,
जरी तुझ लग्न झाल असल तरी.
अन्याय झालाय मित्रांनो माझ्यावर

आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..


आला आला वारा
संगे पावसाचा धारा ..

मला जावू द्याना घरी
आता वाजले कि बारा

मुक्या प्राण्यांवर प्रेम करा
मी पण मुका प्राणी आहे, मुलींनो माझ्यावर प्रेम करा

रात्रीच्या अंधारात आलीस 
आणि माझ्या अंगावरच्या कपड्या सकट सगळ चोरून गेलीस

जरी का मी असलो उपाशी
तरी स्वप्नातल्या स्वप्नात खेळ खेळतो तुपाशी

तू बोललीस तर तुझ्यासाठी चंद्र , तारे तोडून आणीन
पण मला सांग तू त्यांच करणार काय ? 

एकदा मी वाघाच्या काना खाली दिली , 

हत्तीचा कान खेचला , गेंड्याला चापट्या दिल्या .
झल्ला जो प्राणी समोर आला त्याला फटके दिले 
मग दुकानदारांनी लाथ मारून हाकलला मला

 दोघे भाऊ तुझे जेव्हा,

मसाल्या सारखा कुठत होती मला 
सांग तेव्हा तू कुठे होतीस .....
तुझ प्रेम कुठे होत

मी मनालो माझ तुझ्यावर प्रेम आहे.

ती मनाली माझ पूर्वीच एक प्रेम प्रकरण चालू आहे.
केव्हा पासून, मी 
आरश्यात स्वतः ला पाहिलं तेव्हा पासून .............

पती जब तुम्हारा ह्र्दय तोड दे 

तडपता हुवा जब तुम्हे छोड दे 
तब तुम मेरे पास आना प्रिये ........
मेरा दर खुला है , खुला हि रहेगा 
तुम्हारे लिये 

अभी रूपका एक सागर हो तुम 
कमल चाहोगी उतणे खिल जायेंगे 
दर्पण तुम्हे जब सताने लगे
पती भी दामन छुडाने लगे 
तब तुम मेरे पास आना प्रिये ........
मेरा सर झुका है , झुका हि रहेगा 
तुम्हारे लिये 

- आयुष्यभर प्रेम करत राहील 
जरी तुझ लग्न झाल असल तरी

उन्हात निघू नकोस सखे 

उन्हात निघू नकोस सखे 
करपून जाशील 
आणि जायचच असेल तर.......
एक बादली पाणी घेऊन जा 
आमचा गिझर खराब झालाय

मी माझ्या MBBS शिकनाऱ्या मैत्रिणीला डोक्यावर हात ठेऊन म्हंटले, "मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो."

ती म्हणाली, 'हेच जर तू हृदयावर हात ठेऊन बोलला असता तर काय झाल असत.'
मी म्हणालो, 'ते वस्तुस्थितीला धरून नसते झाले.'
ती म्हणाली, 'तू किती रुक्ष आहेस' 

माझ्या पाकिटातल्या फोटोतली माझी प्रियसी मला हळूच मनाली

तुझ्या पाकिटात माझा जीव गुदमरतोय,
मला मोकळा श्वास घेऊ दे ,

तुला चंद्राची उपमा कशी देऊ ?
मला तू २४ तास माझ्या जवळ हवी आहेस 

 तू प्रेमाच नाव एकलस
 मी प्रेम केलय

मी हृदयाला विचारले,
प्रेम आणि मैत्री ह्यात काय फरक आहे ????

आणि आतून आवाज आला

हे बघ मित्रा, माझे काम "Blood Supply" करणे आहे .
असले फालतू प्रश्न मला विचारत जाऊ नकोस ........

तू आहेस म्हणून मी आहे

मी आहे म्हणून तू आहेस
तू नाहीस म्हणून मी नाही 
मी नाही म्हणून तू नाही


माझे (काहीच्या काही) प्रेम पत्र

प्रिये  मी तुझ्या प्रेम रुपी वादळात पुरता अडकलो आहे. आत्ता माझी सुटका तुझ्याच हातात आहे.
मला माहित आहे हि वादळ सगळ बरबाद करत असत. आणि तरीही मी चान्स घेतो आहे. 

तुझ्या प्रेमात मला रातांधळेपणा झाला आहे कि काय अशी पुसट शंका मला येते आहे. कारण रात्रीच्या अंधारात मला चांदण्या न दिसता नुसताच धूर दिसतो आहे. खात्री करण्यासाठी मी हवामानासंबंधित बातम्याही वाचल्या आहेत. प्रेमात अस होत असत म्हणतात. 

प्रिये (लाजून) तुझ्यासाठी मी तारे, चंद्र तोडून आणू शकतो . फक्त तू त्याच काय करशील तेवढ सांग. काही करणार नसशील तर कशाला उगाच त्रास. 

माझ्या प्रेमाचा स्वीकार कर नाहीतर बरबाद कर, शेवटी तू वादळ आहेस 
तुझाच आणि तुझाच 
प्रमोद 

गब्बर यांचे प्रेरणादायी चरित्र

भारतातील महान व्यक्तीपैकी एक म्हणजे गब्बर सिंग होय. पण चरित्रकरांनी त्यांच्यावर नेहमीच अन्याय  केला आहे.
गब्बर यांचे प्रेरणादायी  जीवन लोकांना कळावे म्हणून गब्बरचे हे चरित्र लिहिले आहे.

साधे जीवन व उच्च विचार : गब्बर सिंग खूपच साधे सरळ आयुष्य जगत होता. जुने आणि मळलेले कपडे, वाढलेली दाढी, तब्बल वर्ष वर्ष  न घासलेले दात, आणि डोंगर दऱ्यातील भटके आयुष्य. जसे काय मध्यकालीन भारतातला फकीरच. त्याने आपले जीवन आपल्या ध्येय्यासाठी समर्पित केले होते. त्यामुळे त्याला ऐशो आराम, विलासिक जीवन जगण्यासाठी वेळच नाही मिळाला.  आणि विचारांच्या  परिपक्वते बद्दल काय सांगावे, 'जो डर गया, सो मर गया' या सारख्या संवादांनी त्याने जीवनातल्या क्षणभंगुरतेवर प्रकाश टाकला आहे.   

गब्बरची दयाळू प्रवृत्ती : ठाकूरने गब्बरला आपल्या हातांनी पकडले होते. यामुळेच त्याने  ठाकूरचे फक्त दोन हातच कापले. तो  त्याचा गळा हि कापु शकला  असता, पण त्याच्या ममतापूर्ण आणि करुणामय हृदयाने त्याला असे करू दिले नाही. 

नृत्य आणि संगीताचा चाहता : 'मेहबूबा ओ मेहबूबा'  यां गाण्याच्या वेळेस त्याच्या कलाकार हृदयाचा परिचय मिळतो. अन्य डाकुंसारखे त्याचे हृदय शुष्क नव्हते. तो जीवनात नृत्य-संगीत यां कलेंच महत्व जाणून होता. बसंतीला पकडल्या नंतर त्याच्यातला नृत्य प्रेमी खळबळून जागा झाला होता. त्याने बसंतीच्या आत दडलेल्या नर्तकीला ओळखल होत. तो कलेच्या प्रती आपले प्रेम अभिव्यक्त करण्याचे कोणतेही कारण सोडत नसे.

अनुशासन प्रिय गब्बर : जेव्हा कालिया आणि त्याचे मित्र आपल्यावर सोपविलेली कामगिरी  पार न पडताच वापस आले होते, तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या अनुशासन प्रिय स्वभावाला साजेस वर्तन त्याने केल. आणि त्या तिन्ही जणांना शासन केले.

हास्य प्रेमी : त्याच्याकडे कमालीचा 'सेन्स ऑफ ह्युमर' होता. कालिया आणि त्याचे दोन मित्र यांना मारण्याच्या पहिले त्याने त्यांना खूप हसविले होते. कारण हसता हसता या जगाचा त्यांनी निरोप घ्यावा असे त्याला मना पासून वाटत होते.  तो आधुनिक युगातला 'लाफिंग बुध्द' होता.

 नारीच्या प्रती संम्मान : बसंती सारख्या सुंदर मुलीला पकडल्या नंतर त्याने  तिच्याकडे फक्त एका नृत्याची विनंती  केली. आत्ताचा डाकू असता तर त्याने कदाचित वेगळंच काही तरी  मागितल असत. 

भिक्षुकी जीवन : त्याने हिंदू धर्म आणि महात्मा बुध्द यांनी दाखविलेला भिक्षुकी मार्ग स्वीकारला होता.  रामपूर आणि इतर गावामधून त्याला जे काही मिळत त्यानेच तो आपले भगवत होता. सोने, चांदी, चिकन बिर्याणी, मलाई, पनीर टिक्का इ. भोगविलासी वस्तूंसाठी तो कधी शहराकडे नाही गेला.

सामाजिक कार्य : एकीकडे आपला डाकू पेशा संभाळत असताना तो लहान मुलांना झोपविण्याचे काम हि करत होता. शेकडो माता त्याचे नाव घेऊन आपल्या उनाड मुलांना झोपवत असत. सरकारने त्याच्यावर ५०,००० रुयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्या काळात 'कोन बनेगा करोडपती' नसल्याने  लोकांना रातोरात श्रीमंत बनविण्याचा गब्बरचा हा प्रामाणिक प्रयत्न होता. 

माझे (काहीच्या काही) विचार : शासन व्यवस्था

एक तर वाचून विसरून जावा नाहीतर या गोष्टीवर थोडा विचार करा.  तसेही हे काहीच्या काही विचार आहेत. 

भीती हि मानवाला निसर्गाकडून  मिळालेली सर्वात मोठी देणगी म्हणावी लागेल. 
याच भीतीमुळे मानव संकटा पासून दूर राहतो. मानवाच्या आणि एकूणच सजीव प्राण्याच्या उत्क्रांतीत या भीती भावनेने खूप मोठे कार्य केले आहे. पृथ्वी वरच्या सर्वच सजीवांमध्ये हि भीती दिसून येते. 
या भीती मुळेच प्राणी आपले अस्तित्व राखण्यासाठी एकत्र टोळ्यात राहतात किवा आपला इलाखा निश्चित करून त्यात राहतात. 
पूर्वी याच भावनेतून मानव हि  टोळ्यात राहत होता. पण मानवाच्या  एकूण असतूष्टतेमुळे  मानव दुसऱ्या टोळ्यांवर अधिकार गाजवू लागले. त्या टोळ्यांला आपल्या अधिपत्या खाली ठेवण्यासाठी  शासन व्यवस्था निर्माण झाली. लोकांनी आपल्या शासकाच्या अधिपत्या खाली रहायचे, तो बोलेल तसे वागायचे. यात मानवाच्या हजारो लाखो पिढ्या बरबाद झाल्या आहेत.

आणि आज हि तेच चित्र जगभर पहायला मिळते. वास्तविक हि मानवी जीवनात आलेली मोठी  विकृती आहे. अश्या प्रकारे शासन व्यवस्था निर्माण करण्यामुळे लोकांचा काही फायदा झालाच नाही उलट त्यांचे नुकसानच अधिक झाले आहे. जागतिक युध्द, देशादेशातील युध्द याच शासन अरेरावितून उत्पन होतात. 
शासकांनी २० व्या शतकात  शासन करण्याचे आपले धोरण  बदलले  आणि त्याला भावनिक आधार देत लोकांना हि त्यात सामील केले तेही नावा पुरते. आजही हि  वस्तुस्थिती नाकारता येत नाही. 
वास्तविक शासन व्यवस्थेमुळे मानव अधिकच भीतीत जगू लागला आणि त्यामुळे गुन्हेगारी हि वाढली. याचा पुरावा म्हणून आपल्याला  आदिवासी वनवासी यांच्या कडे पाहता येईल. त्यांच्यात मुळातच गुन्हेगारी वृत्ती नसते. ते शासन व्यवस्थेच्या नियंत्रनात आल्या नंतरच तेही इतरांसारखा व्यवहार करू लागतात.

शासन व्यवस्थेमुळे मानव अधिक अस्वस्थ झाला आहे आणि याच अस्वस्थतेमुळे  आज भयान परिस्थिती मानवापुढे निर्माण झाली आहेत. आज मानवच आपला शत्रू बनला आहे तो एकमेकांना संपविण्याच्या हेतूने कार्यरत आहे. जर मानवाला आपली पिढी यापुढेही टिकवून ठेवायची असेल तर शासन  विरहीत समाज निर्माण करायला हवा. अर्थात यात कित्येक समस्या दिसतील. आपण हजारो वर्ष शासकांच्या गुलामगिरीत असल्यामुळे आपली मानसिकताच मुळात तिच्याशी जुळवून घेण्याची झाली आहे. त्यामुळे हे कठीण वाटेल. पण आपल्या, ज्यांना आपण रानटी म्हणून हिणवतो त्या पुर्वजांनीच याचे उत्तर देऊन ठेवले आहे.   

एकूण काय तर शासन  व्यवस्था हि सामाजिक विकृती आहे. आणि ती फार काल टिकून राहणे हि मानवासाठी घातक आहे.  

माझ्या (काहीच्या काही) कविता : भाग 2

१) मला सुंदर मुली आवडत नाहीत 
कारण सुंदर मुली सुंदर मुलांनाच पसंद करतात 

२) लोकांनी जस भ्रष्टाचाराशी जुळवून घेतल 
तसच उपोषणाशी हि जुळवून घेतील 

३) तुम्ही प्रेमात पडला असाल तर,
एक शिडी स्वतः बरोबर ठेवत जा 
उतरायला कामी येते 

४) माझ्या बायकोच्या गळ्यातल मंगळसूत्र पाहून 
मला फासावर लटकल्या सारख वाटत.

५) प्रेम हळूवार मंद वाऱ्या सारखं असाव 
वादळ नेहमीच नुकसानकारक असते
ते पाहायलाच मजा येते 

६) तू मल्लिका शेरावत असतीस तर किती बर झाल असत 
या मागाईत कपड्याचा खर्च तरी वाचला असता 

७) ती तिच्या प्रियकराला रागाने बोलत होती 'तू नेहमी खरचं का बोलतोस. त्यामुळे लोक दुखावतात.'

८) प्रेयसी आपल्या संघ स्वयंसेवक असलेल्या प्रियकराला बोलत होती,
"किती सुंदर असते संध्याकाळ आईच्या मखमली पदरा सारखी, चल एखादी संध्याकाळ आपण एकत्र घालवू"
संघ स्वयंसेवक असलेला प्रियकर म्हणाला, "नको मला संध्याकाळी शाखा लावायची असते." 

९) ती म्हणाली, आपला जन्म लोकशाही असलेल्या देशात झाला हे आपले नशीब समज.
मी म्हणालो, दारुच्या किमती वाढल्या पासून लोकशाहीवरचा माझा विश्वासच उडालाय .

१०) ती मला म्हणाली, माझ आभाळ तुला घे तूझ आभाळ मला दे 
मी म्हणालो, माझ आभाळ पाहिजे असेल तर नक्कीच घे, पण नंतर बोलू नकोस को माझ आभाळ काळ्या ढगांनी वेढलय म्हणून 

११) असण्या पेक्षा नसलेलं बर, म्हणजे काय ग ?
या वर ती म्हणाली , खर खर सांग तू माझ्याशी लग्न करणार आहेस कि नाही ?

१२) बेडकांचा आणि आपला काही संबंध असेल का रे?
कश्या वरून असे बोलतेस ..... 
पहिल्या पावसात बेडक आणि मानवाच्या सुप्त भावना एकत्र जाग्या होतात म्हणून 

१३) एक दिवशी एक एलियन पृथ्वीवर आला, आणि नेमका आमच्याच छतावर उतरला.
नंतर घरात येऊन हिला म्हणाला, 
वहिनी एक वाटी साखर मिळेल का? 

१४) पावसाचा राग आला होता मला 
ती आल्यावर एक थेंब हि पडला नव्हता 

१५) माझ हृदय दगड आहे असा तिचा समज असल्याने.
रोज नारळ फोडताना तीला माझी आठवण येते 

१६) काय ह्या मुली यांना मस्करीपण सजत नाही 
एकदा माझ्या प्रियसीला मी मस्करीत एक ठेऊन दिली 
आणि ती कोमात गेली. 
काय ह्या मुली यांना मस्करीपण सजत नाही.........

१७) ती मला म्हणत होती ,
घायाळ मनाला आणखी घाव देऊ नकोस 
तुझ्या स्वार्थाला प्रेमाच नाव देऊ नकोस.
मी म्हटलो , जायचं असेल तर गप्प जा,
उगाच मेंदू कुरतडू नको 

१८) कापून टाकला गळा 
आणि मोडला नाही कणा 
इथे आख्खा गळाच कापला 
आता कण्याच काय लोणच टाकणार 

१९) तू परी कथेतील राजकुमारी आहेस का ?
तू हो म्हणालीस, तर मी राजकुमार नाही याचे मला अतीव दुखः होईल 
आणि तू नाही म्हणालीस, तर तू खोट बोलतेस असे मी समजेन

२०) जो जो तुला पाहून आकर्षित झाला 
तो पुन्हा कधीच दिसला नाही.
खर सांग तू मुलगी आहेस कि, कृष्णविवर 

२१) परिस्थितीने भयान रूप धारण केले आहे मित्रा 
आता नावाने मुलींची ओळख पटत नाही, तिच्या चप्पलच्या नंबर ने पटते

२२) दिवसा बाहेर नको निघत जाउस तू 
खगोलशास्रज्ञ गोंधळून जातील.
दिवसा चांदण कस पडल म्हणून

२३) नावात काय आहे, म्हणत 
हीच नाव विचारायचेच राहून गेले .

२४) प्रेमात सैरभैर झालेला एक प्रेमी बोलत होता, 
"अगर तू मुझे नही मिली
तो मै दुनिया जला दुंगा"
हि बातमी पसरताच पोलिसांनी तत्काळ हाय अलर्ट जाहीर केला

२५) झाडावर हि प्रेम करा आणि झाडा खाली हि प्रेम करा 
पण अगोदर झाडे वाचवा

२६) तूझ्या डोळ्यातल लहानपण असच राहु दे, आयुष्यभर

२७) कुणीतरी चंद्राला सुट्टीवर जायला सांगा.
कारण पृथ्वीला एक चंद्र बास झाला. 

२८) प्रेम अमृता पेक्षा गोड असत म्हणतात
पण खर सांगू .....
माझा यावर विश्वास नाही !

२९) खर खर सांग....
तू मुलगी आहेस कि, 'धौती योग चूर्ण'
तुला पाहून पोटात मोकळ मोकळ वाटत 

३०) तू कधीतरी येशील या आशेने 
मी तुझी वाट बघत अजून उभा आहे.
हातात पिघळलेल आईस्क्रीम घेऊन 

३१) ती त्याला म्हणाली आज तोंड धुवून आलास का ,
तो म्हणाला काय झाल काही विशेष 
तो ..... काही विशेष नाही रे , म्हटल आज तुला कीस कराव 

३२) तुझ्या केसातल प्राणी संग्रालय पाहून 
मला तुझा हेवा वाटतो.

३३) तुझ्या केसात साचलेल पावसाच पाणी 
मला पावसापेक्षा हवस वाटत 

३४) योगायोग बघ .........
ज्या दिवशी तू मला सोडून घेलीस 
त्याच दिवशी आमचा ज्योतिषी म्हणाला .......
अभिनंदन तुच्यावरची शनीची वक्र दृष्टी दूर झाली आहे 

३५) शाळेचे दिवस किती सुंदर होते 
रोज एक chocolate द्यायचो तिला , काय खुश व्हायची ती
शाळेचे दिवस किती सुंदर होते , मस्त आणि स्वस्त 

३६) ये आई चल पावसात चिंब चिंब भिजू 
आपण दोघे हि लहान होऊ ,
लहान व्हायला काय लागत, 
फक्त थोड्याश्या वेडेपणाच भांडवल, 

३७) मुलांनो आणि मुलींनो 
रस्त्यात चालताना कृपया प्रेमात पडत जाऊ नका .
पावसाळ्यात खड्यांची मोठी समस्या निर्माण होते 

३८) तू एक ना एक दिवस येशील
याची पूर्ण खात्री आहे मला 
म्हणून हल्ली अस्वस्थ असतो मी 

३९)भूतकाळ आणि भविष्यकाळाच्या मध्यावर प्रत्येकाचा प्रवास चालू असतो .
अपवाद फक्त तू !!

४०) आपल्या दोघांच मिलन कधी होऊ शकल नाही,
याच मला जरा सुध्दा नवल वाटत नाही ........
भूमितीचा नियमच सांगतो , 
दोन समांतर रेषा कधीच एकमेकींना छेदत नाही.

४१) मी म्हंटल, मी वादळात सापडलो असताना तू मला सावरल का नाहीस.
तू म्हणाली , मी स्वतः सावरल्यावर सावरणारच होते तुला 

४२) चंद्राच काय कोतूक करायचं,
तो तर पृथ्वी भोवती स्वतः च घिरट्या घालत असतो 

४३) तुझ आभाळ तुला घे 
आणि माझ आभाळ मला दे 
खूप झाली देवान घेवाण 

४४) रस्त्यात चालताना तू हसत जाऊ नकोस 
अपघातांची संख्या वाढलीय हल्ली 

४५) तू मला आवडतेस 
पण सुंदर दिसतेस म्हणून नाही 
तू सुंदर आहेस म्हणून 

४६) मी तुझ्या प्रेमात पडलो कारण 
तू म्हणालीस, मला कोणी भाऊ बहीण नाही, मी एकुलती एक आहे.
मग काल मला मारून गेला तो कोण होता......खोटारडे !!

४७) तुझी पप्पी इतकी गोड होती कि ,
माझ्या ओठांवर मला मुंग्यांची रांग दिसली होती 

४८) मला गर्लफ्रेंड नाही हे कोणाला कळू नये म्हणून, 
मी स्वतः च माझ्या बाईकची मागची शिट पुसून काढतो

४९) माझा भौतिक शास्रज्ञ मित्र हिला तिचे डोळे मागत होता 
संशोधन करायचय म्हणून.......
कारण मीच त्याला बोललो होतो ,
अरे यार मला हिच्यां डोळ्यात विश्व दिसत म्हणून 

५०) मागे एकदा साखर मागायला आलेला एलियन 
माझ्या बायकोला पळवून घेऊन गेला..........
मला हेच कळत नाही कि 
हे एलियन माणसाची मदत करायला एवढे उतावळे का असतात.