का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

मंगळवार, १३ सप्टेंबर, २०११

काहीच्या काही कविता - ५

1) खूप दिवसा नंतर तो तिला भेटला ........
पूर्वीचा राग विसरून ती त्याच्याशी खूप बोलली,
आणि तोही तितक्याच मोकळे पणाने बोलला ........
खूप हसले, आनंदले ते दोघे ..... पूर्वीचे दिवस आठवून
ती घरी आली, तिच्या नवरयाला आणि मुलाला पाहून ती भानावर आली,
मग तिला आठवल,
अरे आपल रडण तर राहूनच गेल ...................

2) प्रिय अमृता ......
तुझ वस्तुमान किती आहे, सांगशील का ?
मला माहित आहे तू, कशाला म्हणून विचारशील!
अग ...........
वस्तुमान काळालाही वाकवत म्हणतात,
सध्या माझा काळ खूप वाईट चाललाय !

3) डबक्यातल्या पाण्यात परावर्तीत झालेल्या, उगवणाऱ्या सूर्याच्या तांबड्या किरणाच्या प्रकाशाची शप्पत तुम्हाला आहे.
घोंघावणाऱ्या वाऱ्यात अडकून हेवकावे खाणारया प्लाष्टिकच्या पिशवीची शप्पत तुम्हाला आहे.
चिमणी, कावळा आणि कबुतरांच्या दीर्घ शंकेमुळे झाडाखालच्या, पांढऱ्या शुभ्र झालेल्या त्या काळ्या कुट्ट, मठ्ठ, निर्जीव दगडाची शप्पत तुम्हाला आहे.
अवकाशात आपल्याच मस्तीत, नियमांना धुडकावून, आपल्या अस्तित्वाच्या खुणा चौफेर उडवीत जाण्यारया धूमकेतूच्या शेपटीची शप्पत तुम्हाला आहे.


मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

पुन्हा माझ्या (काहीच्या काही) कविता

1) सापेक्षता वादा वरून माझा विश्वासच उडाला आहे ........
म्हणे सगळ विश्व नियमाने चालत,
अस असत तर, ती सोडून गेली असती असती मला



2) ती : एक सांगशील, वारा वर्तुळातच का फिरत असतो,
चौकोनी, त्रिकोणी, आयात मध्ये का फिरत नाही?
तो : वारा कसाही फिरू दे, त्याने काय फरक पडतो ...........
शेवटी सगळे ३६० अंशच असतात , तसचं प्रेमाच हि आहे!
ती : हम्म्म्म ..... किती रुक्ष आहेस तू ,

ती म्हणाली, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगशील का ?
तो म्हणाला, माझ तुझ्यावर हाताच्या मुठी एवढ प्रेम आहे,
ती थोडी रागातच म्हणाली, बस हाताच्या मुठी एवढच प्रेम करतोस माझ्यावर ?
तो हसत म्हणाला, अग आपल हृदय आपल्या मुठी एवढच असत. त्याला मी काय करू ?
ती एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाली, ह्म्म्म ........ किती रुक्ष आहेस तू !

3) मी मागितला होता हात तिला प्रेमाचा 
ती म्हणाली , प्रेमाचा काय भरोसा, मैत्रीचा हात देत असशील तर बोल 

4) तू माझ्या पुढे चालू नकोस 
कारण तुझ्या मागे मी येणार नाही,
तू माझ्या मागेपण चालू नकोस
कारण तुझा वाटाड्या मी होणार नाही
तू माझ्या बरोबरीने चाल ..............

5) त्या गरीब मुलाला आजही पोटभर जेवण मिळू शकल नाही 
आणि तो तसाच उपाशी पोटी झोपला ...........
पण,
एका चित्रकाराच ते चित्र लाखो रुपयाला विकले गेले
ज्यात एक भुकेला मुलगा उदास चेहऱ्याने बसला होता 

6) माझी पहिली कविता 
माझ्याच मित्रा बरोबर पळून गेली
तेव्हा पासून ती "काहीच्या काही कविता" झाली 


मंगळवार, ९ ऑगस्ट, २०११

छोटी प्रेम कथा

तो -"आज माझे हृदयाचे ऑपरेशन आहे"
ती -"माहित आहे"
तो -"आय लव यु!"
ती -"आय लव यु टू!"
ऑपरेशन नंतर तो शुद्धीत येतो तेव्हा त्याला शेजारी कोणीच दिसत नाही.
तो तिला जोर जोरात हाका मारतो. "कुठे गेलीस मला सोडून"
आणि त्याच्या हृदयातून आवाज येतो, "तुला काय वाटते, तुला दुसरे हृदय कोणी दिले?"
"मी येथेच आहे, तुझ्या अगदी जवळ"
तो जोरजोरात रडायला लागतो !

शनिवार, ६ ऑगस्ट, २०११

एका वेड्याची कहाणी

त्याला येताना  पाहून, फार वर्षाचे जुने असलेले ते वडाचे झाड खुश झाले. आणि त्याला आपल्याकडे बोलाऊ लागले,
"अरे ... मुला, ये ऐकतोस ना ?"
काही काळासाठी त्याला आश्चर्य वाटले. पण काही काळासाठीच. आजकाल त्याच्या बरोबर कोणीही बोलू शकते, हे त्याला  माहित होते. लोक त्याला वेडा म्हणायची. त्याला त्याची पर्वा होती कुठे, तो आपला आपल्याच धुंदीत मस्त असायचा.
त्याने वळून झाडाकडे पाहिले. 
"काय बोलतोस मित्रा, कसा आहेस. एवढा काळ लोटला पण तू अजून बदलला नाही बुवा"
"अस कस बोलतोस, बदल तर झाल्याय, खूप बदल झालाय. तुझ्यात, माझ्यात आपल्या सर्वांच्यात"
"पण मग दिसत नाही कसा तो मला"
"अरे दिसेल कि, डोळे उघडे ठेऊन पाहिलस कि दिसेल तुला बदल झालेला. ते जाउ दे, एवढ्या वर्षानंतर दिसलास. कोठे होतास"
"मी कोठे असणार भटकत असतो एकटाच .......  हो , बहुतेक एकटाच"
"बहुतेक"
"तू सांग कसा आहेस, तू तर कोठेही भटकू शकत नाहीस, आपला वर्षानुवर्ष एकाच जागेवर. कसा राहू शकतो तू एका जागेवर, मी नाही राहू शकत असा"
"हम्म्म .......... ती एक गंमतच आहे, अस वर्षानुवर्ष एका जागेवर रहायची"
त्या वर तो चेहऱ्यावर चिडचिडेपणाचे भाव आणून म्हणाला, "छे, यात काय आली गंमत"
खर तर वडाच्या त्या झाडाला अस संभाषण नको होत, त्याला वेगळाच काही तरी बोलायचं असाव, अस त्याला वाटल. हे नेहमी व्हायचं, समोरच्याला काय बोलायचय हे त्याला कळायचं आणि मग समोरचाही त्याच मुद्द्यावर संभाषण चालू ठेवायचा. किती अजब होत हे, पण त्याला नाही वाटायचं हे अजब, आणि लोकांना ............. त्यांच्या दृष्टीने तो तर वेडाच होता ना. 
मग झाडच बोलले ......... 
"तुम्ही दोघ बसायचात माझ्या फांद्यांच्या सावलीत, मजा  यायची मला ........... तुम्ही आलात कि बघत रहायचो तुमच्या दोघांकडे. एक सांगू, अस मी कोणाला सांगत नाही पण तुला म्हणून सांगतो, तुम्ही दोघ येथे बसायला याचातना तेव्हा तुम्हाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मी माझ्या फांद्या तुम्ही बसलेल्या जागेवर एकवटून घ्यायचो. ........... हो पण तुमच्यासाठी नाही बर का, मला खरचं तुम्ही माझ्या विसाव्याला बसलेलं खूप आवडायचं. किती बोलायचात तुम्ही, आणि काय काय बोलायचात, खरचं तुमच्या सारख कोणी नाही आल पुन्हा, आत्ताची सगळी पोर एकदम लुच्ची ...... त्यांचे  धंदे पाहून मलाच ढवळायला  होत. नको वाटत त्यांच्याकडे पहाणे."
झाडाच हे बोलण ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आल. ते नेहमीच यायचं. त्यांच्या शाळे जवळचा दगड, ज्यावर ते दोघेही बसायची, तोही अशीच आठवण काढत होता. सगळेच त्यांची आठवण काढत  होते, त्याच्या इमारतीची गच्ची, ते दोघ पावसात ज्या छत्रीत एकत्र यायचे ती छत्री आणि अजून बरेच काही त्याच्याशी या विषयावर बोलायचे आणि काही बोलणार होते ............. तो त्यांना त्याची आणि तिची  कहाणी  सांगायचा. सांगून झाल्यावर ऐकणारा (नेहमीच) खूप रडायचा, मग शेवटी यालाच त्याची समजूत घालायला लागायची, तो समजूत घालायचाही. जीवन म्हणजे काय आणि ते कसे असते ते तो त्यांना समजावून द्यायचा..... एवढे सांगितल्यावर मग तो आयुष्यावर बोलायचा, "आयुष्यात कधी रडायचं नाही, आयुष्याच कामच मुळी रडवायचं असत. मग अस रडून त्याला आपल काम फत्ते झाल्याचा आंनद मिळूवून कशाला द्यायचा."
असच  काहीतरी तो भरपूर बोले, समोरचा समजला अस त्याला जेव्हा वाटे तेव्हा तो निघून जाई"
आत्ता हि संभाषण नेहमी सारख त्याच विषयावर आल होत,
तो आणि ती ......... त्याचा कधीहि  न संपणारा प्रवास.
"अरे तुम्ही माझ्या सावलीत बसायचा हे खर तर माझ्यासाठी भूषनच  होत, तुमच्या सारखे प्रेमी मी आयुष्यात कधीच नाही बघितले, काय प्रेम होते ते............  तो आवेग, ते व्यक्त होण, ते एकमेकात सामावून जाण, एकरूप होण... मी पहिल्यांदाच पाहिलं ते.  आज एवढ्या दिवसांनी दिसलास मला.  
आत्ता या क्षणी मला ते क्षण पुन्हा दिसू लागलेत. 'ती तुझ्या मिठीत आहे, तुझ्या छातीवर डोक टेकवून तुझ्या डोळ्याच्या आरपार पहात आहे. तिच्या डोळ्यात विश्वाच गूढ मला दिसतंय, आणि तुझ्या डोळ्यात तेच विश्वाच  गूढ  तिने उलघडले दिसतेय." मला पुन्हा पुन्हा हेच दिसतय. 
एक दिवस तुम्ही  अचानक गायब झालात, तेव्हापासून मी तुमची  खूप वाट पहातोय. तुम्ही आत्ता याल नंतर याल म्हणून मी तुमची वाट पाहत होतो, पण तुम्ही आलाच नाहीत, आणि आज इतक्या दिवसांनी आपली भेट झाली, तेही तुझ्या  एकट्याशीच, 
तू एकटाच का आलास? तीला का नाही बरोबर आणलेस?
या प्रश्नाची त्याला सवय झाली होती, (हा प्रश्न त्याला अपेक्षितच होता) सर्वांनीच  त्याला हा प्रश्न विचारला होता, या प्रश्नानंतर काय बोलावे हे त्याला पाठ होते. सगळाच नेहमी सारख चाललं होत. नेहमीच असल तरी त्याचा त्याला कंटाळा नव्हता. आत्ता तो झाडाला हि तेच  सांगणार होता. तो तयार झाला. झाडाला त्याची हकीकत सांगावीच लागणार होती, शेवटी ते झाड हि त्याच्या आणि तिच्या प्रेम कहाणीचे साक्षीदार होते, त्याला कळायलाच हवे होते, खरे तर तो त्याचा हक्कच  होता अस त्याला वाटत होत, म्हणून आत्ता तो त्या सगळ सांगणार होता, हातच काहीही न राखता.
आणि  तो बोलू लागला ................
त्याची आणि तिची विस्कटलेली, फाटलेली प्रेम कहाणी 

बुधवार, ३ ऑगस्ट, २०११

माझ्या (काहीच्या काही) कविता : 6

1) राहून राहून एकच वाटत .....
दोन हृदय असती तर बर झाल असत नाही.


2) तो : "तुझा हात पुढे करशील का ?"
ती : "कशाला"
तो : "तुझ भविष्य पहायचं होत मला"
ती : "हे घे, बघ"
तो : "तुझ्या हाताच्या रेश्या सांगतायत कि, आज तुला एक मुलगा 'प्रपोज' करणार आहे"
ती  " हो का, कोण आहेत ते महाशय, ते हि रेश्या सांगतात का?"
तो : "हो"
ती : "मग सांग"
तो : "माझ तुज्यावर प्रेम आहे "



3) हल्ली डोळ्यात पाहवत नाही तुझ्या,
रागाने बोलत असतात माझ्याबद्दल .........

4) पुण्याच्या मुली आणि पुण्याची हिरवळ 
हे फक्त पुण्यातच सापडते असे नाही
ते सगळीकडे सापडतात .......
त्यासाठी फक्त या दोघांमधला फरक कळाला पाहिजे.


5) दिवसाची खिडकीत उभी राहत जाऊ नकोस 
तुला पाहून सूर्य आणखीन जळायला लागतो ......

6) डोळे पुसायला जवळ कोणीतरी आपल माणूस असलं कि,
बर वाटत म्हणतात  ...........
पण जवळ आपल माणूस असताना लोक का रडत असतात