का, कोणासाठी आणि कशासाठी याच उत्तर मला हि माहित नाही, तरीही मी जगतो आहे.

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

पुन्हा माझ्या (काहीच्या काही) कविता

1) सापेक्षता वादा वरून माझा विश्वासच उडाला आहे ........
म्हणे सगळ विश्व नियमाने चालत,
अस असत तर, ती सोडून गेली असती असती मला



2) ती : एक सांगशील, वारा वर्तुळातच का फिरत असतो,
चौकोनी, त्रिकोणी, आयात मध्ये का फिरत नाही?
तो : वारा कसाही फिरू दे, त्याने काय फरक पडतो ...........
शेवटी सगळे ३६० अंशच असतात , तसचं प्रेमाच हि आहे!
ती : हम्म्म्म ..... किती रुक्ष आहेस तू ,

ती म्हणाली, तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ते सांगशील का ?
तो म्हणाला, माझ तुझ्यावर हाताच्या मुठी एवढ प्रेम आहे,
ती थोडी रागातच म्हणाली, बस हाताच्या मुठी एवढच प्रेम करतोस माझ्यावर ?
तो हसत म्हणाला, अग आपल हृदय आपल्या मुठी एवढच असत. त्याला मी काय करू ?
ती एक मोठा सुस्कारा सोडत म्हणाली, ह्म्म्म ........ किती रुक्ष आहेस तू !

3) मी मागितला होता हात तिला प्रेमाचा 
ती म्हणाली , प्रेमाचा काय भरोसा, मैत्रीचा हात देत असशील तर बोल 

4) तू माझ्या पुढे चालू नकोस 
कारण तुझ्या मागे मी येणार नाही,
तू माझ्या मागेपण चालू नकोस
कारण तुझा वाटाड्या मी होणार नाही
तू माझ्या बरोबरीने चाल ..............

5) त्या गरीब मुलाला आजही पोटभर जेवण मिळू शकल नाही 
आणि तो तसाच उपाशी पोटी झोपला ...........
पण,
एका चित्रकाराच ते चित्र लाखो रुपयाला विकले गेले
ज्यात एक भुकेला मुलगा उदास चेहऱ्याने बसला होता 

6) माझी पहिली कविता 
माझ्याच मित्रा बरोबर पळून गेली
तेव्हा पासून ती "काहीच्या काही कविता" झाली 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा